Sunday, January 08, 2006

बाळगुटीचे रामायण. . .

आज सकाळी घरात मी खुप चीडचीड केली. आईने बाळाला कसली तरी गुटी भरवली. डॉक्टरांनी आणि मी सुद्दा क़ृपालीला आणि घरात सगळ्यांना सांगुन ठेवले होते की बाळाला कमीतकमी तीन महीने तरी आईच्या दुधाशिवाय बाहेरचे काहीही द्यायचे नाही, आणि नंतर सुद्दा डॉक्टरांना विचारल्याशिवाय, दुधा व्यतिरीक्त इतर काही द्ययचे नाहि. तरी आज बाळाला गुटी उगाळुन पाजली. मला समजल्यावर खुप राग आला. मग मी घरात सगळ्यांना वाटेल तसे बोललो. माझ्यामुळॆ आज घरात जरा गरम वातवरण आहे. माझ्याशी मी विचारल्याशिवाय कोणी बोलत नाही.

आता तुम्हीच सांगा माझे काय चुकले. आपण बाजारातुन आणलेला शर्ट सुद्दा निट जपुन वापरतो, मग मुलांच्या बाबती असे का वागतो. नवजात बाळांना आईच्या दुधाव्यतिरीक्त कशाची गरज नसते. त्यांची पचनसंस्था बाहेरच्या कोणत्याही खाद्यपदार्थासाठी तयार नसते, तसेच त्यांची सर्व इंद्रिय, पचनादी कार्य सुरळित सुरु व्हायला अजुन वेळ असतो. त्या कालावधीत आपण जर त्यांचावर असा अतीरेक करत राहिलो तर त्यांच्या शरिरातील पचनादी कार्य करणार्‍या संस्थांचा विकास व्यवस्थीत होत नाही. मग पुढे त्यांना, कोठा घट्ट होणे, संडासला व्यवस्थित न होणे, अंगावर पांढरे चट्टे उठणे इ. विकार होतात.
हे सगळे डॉक्टरांनी समजाउन सांगितले तरी घरातल्या बायकांना असला शहाणपणा करण्यात धन्यता वाटते. त्यांना हे करु नको सांगीतले की त्यांचे एकच ठरलेले उत्तर असते, "आम्ही इतकी बाळंतपण काढली, त्यांना काय झाले, आम्हाला काही कळत नाही का?" आणि मग बाळाला काही झाले की बापाने त्याला घेउन दवाखान्याचा खेपा घालायच्या. ह्या सगळ्या बायकांना स्वत:ला डॉक्टर पेक्षा किती जास्त समजते आणि नवजात अर्भकांना ह्याच कशा व्यवस्थित संभाळु शकतात याची खुमखुमी मिरवायची असते, दुसरे काही नाही. त्यांच्या मते पुरुषांना बालसंगोपणातले काही कळत नाही आणि ह्या बाबबती त्यानी त्यांची टंग अडवु नये, असे असते.
म्हणजे आपण पुरुषांनी काय करायचे, तर नुसते बघत बसायचे. बाळाच्या बाबतीत ह्या बायकांनी त्यांचा हट्ट पुर्ण करायचा आणि काही बिघडले की आपण पुरुषांनी, आपण बाप आहोत म्हणुन त्या चुका निस्तारत फिरायचं.

आमचे बाळोबा बाकी मस्त आहेत. त्याचे कसे आहे माहीती का - "अपनी धुन मे रहता हुं". मस्त झोपायचे, भरपुर आळस द्यायचा, मनसोक्त पोटोबा करायचा, काही दिसते का ते बघायचे, वाटलेच तर गालातल्या गालात हसायचे, अधुन मधुन गळा काडुन स्वत:च्या आवाजाची चापपणी करायची, पुन्हा पोटोबा करायचा आणि मस्त झोपायचे. मी सकाळी एवढी कटकट केली पण हे साहेब आपल्याच मस्तीत गुल. असच जर कायम जगता आलं तर किती मस्त होईल!

जाता जाता सुचलेले शहाणपण. . . घरात लहान मुलं असतांना, बाळंतिण असतांना आणि तसे म्हणाल तर येरवी सुद्दा शक्यतो भांडण होऊ देउ नये. आणि ही एक गोष्ट मात्र माझ्या . . . बापाच्या हातात आहे. !

3 comments:

Anonymous said...

wa wa wa!
actully hi wahwa fakta ya post lach nasun tujhya poorna blog la ahe. mitra, kay sahi lihitos re tu? hallichya marathi wartaman patran madhle kathit vinodi likhan wachun, marathit vinod houch shakat nahi ki kay ashi bheeti watat hoti!
aso.
tuza blog cha wishay pan baki jam sahi ahe mitra!
bwt, mala pan marathit blog suru karaychi ichchha ahe. mi patrakar hotoy, tantrik dnyaan betachech ahe. tari krupaya mala ani itar hotkarunna (blogger and not baap!)(bagh waeet vinod wachun wachun kasle pj suchtat!) aso. tar hotkaru mandalinna margadarshan kar.
asach chhan likhan karat raha. balobal god god papa..
krupabhilashi,
ashish.scribe@gmail.com

Nandan said...

ashish, marathitoon blog suru karavayacha asalyas ha lekh (http://marathiblogs.net/node/24) vachava, tyatoon bareech changali mahiti miloo shakil. aapalya bhavee upakramala shubhechchha

nilesh.gawde said...

आशिष, नंदन
धन्यवाद! नंदन तु जी माहिती पुरवलीस त्याबद्दल तुझे विशेष आभार. आशिष तुला नंदनने दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. मी सुद्धा या क्षेत्रात नविनच आहे. तेव्हा तुही भिंदास्त उडी मार. फक्त, एकदा सुरु केलेस तर लिहीणे बंद नको करुस. मदतीसाठी मी, तसेच इतर सर्व मराठी ब्लॉगर्स सदैव उपलब्द असतील, तु फक्त हाक मार...

निलेश्